अॉगष्ट क्रांती दिनाच्या निमित्याने
अॉगस्ट क्रांती दिन चिरायू होवो!
भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही,त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला.कित्येक क्रातीकारक लढले.शहीद झाले.काहींची नावं इतिहासात नाहीत.काहींची आहेत.पण जे जे या देशासाठी लढले.त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोकं त्यांना शिव्या हासडतांना दिसतात.ही या देशाची शोकांतिका आहे.निदान आपण तरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करु शकलो नाही.आताही करण्यासारखे असूनही करु शकत नाही.हे सगळं विसरुन त्यांना शिव्या देण्याचं नव्हे तर बदनाम करण्याचं काम नेहमी काही लोकं करीत असतात. खरं तर नऊ अॉगष्ट हा क्रांती दिन म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.पण असे असले तरी या दिवसासाठी आठ ऑगस्टलाही जास्त महत्व आहे.याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबई मध्ये एक प्रस्ताव पारित केला.त्या प्रस्तावानुसार नऊ ऑगस्टपासून आपण चलेजाव भारत छोडोचं आंदोलन करु असं ठरलं.प्रत्येक नेत्यांनी रस्त्यावर उतरुन अहिंसक मार्गाने स्वातंत्र्याचा उठाव करु असं ठरलं.त्याला कारणंही तसंच होतं. १९३९ ला द्वितीय महायुद्ध सुरु झालं.त्या महायुद्धात जर्मन फौजांनी इग्लंडवर सरशी केली.त्यावेळी येथील भारतीय नेत्यांना इंग्रजांनी म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा.बदल्यात आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देवू.पण ज्यावेळी युद्ध संपलं,तेव्हा त्या इंग्रजांनी भारतीयांना दगा देत त्या स्वातंत्र्य देण्यापासून माघार घेतली.त्यामुळं पर्यायानं भारतीय नेत्यांची मनं नाराज झाली.म्हणून त्यांनी चलेजावचा उठाव करण्याचं ठरवलं. या संदर्भात आठ अॉगष्टला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक होण्यापुर्वी त्याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक चार अॉगष्टला झाली.आपल्याला इंग्रजांनी धोका दिला या विषयावर ती बैठक होती.आपण अहिंसक मार्गानं उद्या रस्त्यावर उतरु हेही विषय होते.परंतू याला बैठकीतील काही लोकांची सहमती झाली नाही.त्यातच काँग्रेसचे जेष्ठ नेते सी राजगोपालाचारी यांनी याच विषयाच्या संदर्भात पार्टी सोडली.त्यामुळं चार अॉगष्टला झालेली बैठक निष्फळ झाली.त्यामुळं त्याच्याच चार दिवसानं म्हणजे आठ अॉगष्टला परत बैठक भरली.तिही याच विषयावर. या बैठकीतही हाच विषय होता.पण याही बैठकीत हिंदू महासभा,मुस्लिम लीग व भारतीय कम्युनिस्ट पक्षीने विरोध केला.त्यांचं म्हणणं होतं की अहिंसक मार्गानं जरी आपण आंदोलन करीत असलो तरी इंग्रज आपल्याला सोडणार नाहीत.ते आंदोलन दडपवून टाकण्यासाठी बळाचा वापर करतील गोळ्या झाडतील.मग त्यात कित्येक भारतीय लोकं मरतीय.म्हणून हो आंदोलन नको.पण आंदोलन जर केलं गेलं नाही तर या देशातून इंग्रज कधीच जाणार नाही असं तत्कालीन भारतीय नेत्यांना वाटत असल्यानं त्यांनी काही संघटनांचा विरोध होवूनही आंदोलन छेडलं.आठ अॉगष्टला प्रस्ताव पारित झाला व नऊ अॉगष्टला आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन भारतीयांसाठी नवं नव्हतं.यापुर्वीही दहा मे १८५७ ला देशात असंच आंदोलन झालं होतं.तो १८५७ चा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध आहे.यात बहादूरशहा जफर,नानासाहेब,राणी लक्ष्मीबाई,झलकारीबाई,व तात्या टोपे यांचे विशेष योगदान आहे.तो इतिहास येथील भारतीयांना माहित होता.तसेच तंट्या भील उर्फ भीमा नायक,चंद्रशेखर आझाद,भगतसिंह,राजगूरू,सुखदेव यांना देश विसरला नव्हता.त्यांनी केलेलं प्राणांच बलिदान येथील भारतीयांच्या रक्तात होता.याच बलिदानाचा इतिहास आळवू आळवू देश गांधीजींच्या नेतृत्वात एकत्र झाला होता.मग कित्येक नेते लढले.नेत्यांची धरपकड होताच साता-यात नाना पाटील,नागपूरमध्ये मगनलाल बागडी,सेलोकर गुरुजी यांनी मोर्चा सांभाळला.तसेच यामध्ये बरीच मंडळी शहीदही झाली. तसेच चिमूरमध्येही बरीच मंडळी शहीद झाली. १८५७ ते १९४२ पर्यंतचा इतिहास रक्तरंजितच होता.कित्येक भारतीय अहिंसक मार्गानं जरी इंग्रजांचा विरोध करीत असले तरी ते गोळ्या झाडत असत.सायमन कमीशनमध्ये लाला लजपतराय यांनी सायमन गो बैक म्हणत मिळवणूक काढताच त्यांना लाठीमार करुन घायाळ केलं होतं,त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेतही तेच घडलं.म्हणून आठ अॉगष्टला झालेल्या बैठकीत प्रस्ताव पारित झाल्यानंतर करो या मरो असा आदेश देत नेत्यांनी चलेजाव भारत छोड़ो चं आंदोलन छेडलं.ही भारतीयांची इंग्रजांना एक चपराकच होती. प्रस्ताव पारित होताच व उद्या आंदोलन छेडणार आहे हे माहित होताच इंग्रजांनी येथील भारतीय नेत्यांना कैद केलं.महात्माजींना पुण्याला आगाखान पैलेसमध्ये ठेवलं.नेहरू तसेच इतर नेत्यांनाही पकडून देशातल्या वेगवेगळ्या तुरुंगात ठेवलं.तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की आता प्रत्येकजण नेता आहे.इंग्रजांना घाबरु नका.प्रतिकार करा.स्वतःला स्वतःचा नेता समजा. शेवटी नऊ अॉगष्टपासून सुरु झालेल्या अहिंसक आंदोलनाला पांगविण्यासाठी इंग्रज सैनिकांनी निरपराध भारतीयांवर जालियनवाला बागेसारखा गोळीबार केला.त्यात निरपराध माणसे मरण पावली.कित्येक आंदोलन करणारी आणि न करणारीही.त्यामुळं चिडून जावून येथील भारतीय लोकांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या.कित्येक पोलिसठाणे जाळले.सरकारी इमारती जाळल्या.कित्येक लोकं भुमीगत झाले. यात कित्येक विद्यार्थीही शहीद झाले. जेव्हा ही घटनेची माहिती महात्मा गांधींना झाली.त्यांनी तुरुंगातच एकवीस दिवसाचं उपोषण केलं.त्यातच त्यांचं स्वास्थ बिघडलं.त्यातच ते मरण पावतील व पुन्हा देशात रोष वाढेल याचा विचार करुन इंग्रजांनी त्यांना १९४४ मध्ये तुरुंगातून सोडले. आंदोलन यशस्वी झाले नाही.मग काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला हिंदू महासभा,वामपंथी दल व मुस्लिम लीग नावे ठेवू लागली.पण महत्वाचं सांगायचं झाल्यास १९४२ चं आंदोलन यशस्वी जरी झालं नसलं ,१८५७ सारखं……..तरी त्या झालेल्या आंदोलनातून इंग्रजांना एक शिक मिळाली.ती म्हणजे आता या देशातून गेल्याशिवाय उपाय नाही.त्यांनी त्यानंतर वेगवेगळ्या बैठका घेतल्या.ज्यांनी या आंदोलनाला मदत केली नाही.त्यांनाही विचारणा करुन शेवटी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निश्चय केला.त्यात काही अटीही टाकल्या. बहुतेक आजही कोहीनूर भारताचा हिरा इंग्लंडमध्ये आहे.शंकुतला एक्सप्रेसचे पैसे आजपर्यंत इंग्लंडला जात होते.कदाचित अशाच तर अटी नव्हत्या इंग्रजांच्या की त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं. या देशात हिंदू मुस्लिम भांडणं नसतांना इंग्रजांनी दोघांच्याही धर्म भावना भडकवून ज्या चाली चालल्यात.त्या चालीतून भारत पाकिस्तान बनला.तसेच अजूनही हा भारत पाकिस्तान वाद भारतात धुमसतच आहे.काल काश्मीर वाद होता.आज सीमावाद आहे.अन् आम्ही भारतीय कालही आपापसात लढत होतो.मी हिंदू मी मुस्लिम म्हणत.आजही लढतो.कोणत्याही देशात वाईट गोष्टी घडल्याच तर त्या ते ते धर्मीय मंडळी त्या त्या धर्मांनीच केल्या असे भांडतो नव्हे तर या देशाच्या एकात्मत्तेला तोडण्याचे काम करतो. एवढंच नाही तर या देशातील शांतता भंग करतो.नेत्यांच्या आश्नासनात फसतो.नेत्यांबरोबर आपणही आपल्या महापुरुषांना शिव्या द्यायला लागतो.पण याचा विचार करीत नाही की त्या नेत्यांनी त्या काळात जे काही कार्य केले,ते अतुलनीय होते.ते नसते तर देश स्वातंत्र्यही झाला नसता.आपण गुलाम असतो इंग्रजांचे आणि आपली पिढीही गुलाम राहिली असती.देशाला स्नातंत्र्य कधीच मिळालं नसतं आजही.कारण कालच्या नेत्यात जी लढण्याची ताकद आहे.ती आजच्या नेत्यात दिसत नाही.हे नेते फक्त आश्वासन देवू शकतात.शिव्या हासडू शकतात.
भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्याने
गणित….आयुष्याचे गणित जुळवता जुळवता आयुष्य संपुन जाते.संपुर्ण आयुष्य माणसाचं लढण्यात झगडण्यात निघुन जात असते.आपण जरी कोणाशी भांडण केलं नाही तरी लोक आपल्याशी नेहमी भांडण करीत असतात.भांडण करण्यातच त्यांना धन्यता वाटत असते.काही काही मंडळी तर निंदा करुन एक दुस-याची भांडणे लावुन आपसात लढवत असतात. भारताला स्वातंत्र मिळालं.सर्वांना आनंद झाला.तेही स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इंग्रज याच भारतातील लोकांना आपपसात लढवत असत.हिंदु मुस्लीम यांची नेहमीच भांडणं होत असत.कधी बंधुकींना गाईचं,डुकरांचं मांस लावुन हिंदु मुसलमानांच्या भावना दुखविल्या जात असत.१९०५ ला केलेली बंगालची फाळणी हे याचे उत्तम उदाहरण आहे. आजही भारत सुधारणेच्या पलिकडे आहे.देशाला सुधरवु म्हणणारे सुधारक स्वतः सुधारत नाही. मात्र दुस-याला सुधारण्याची अपेक्षा करतात. दुसरा कसा सुधारणार? अलिकडे निर्माण झालेला वाद……वन्देमातरम् म्हणत नाही.जो जो म्हणणार नाही.त्याने देशाबाहेर जावे. आज परिस्थिति पाहता चीन आपला सराव करुन सैनिकांकडुन प्रसंगी गोळीबार करुनही भारताला धमकी दाखवत आहे.इकडे पाकिस्तानही संधीची वाट पाहतो आहे.जणु त्यांना आमच्या आपसी झगडण्याने फायदा मिळेल असे आमचे वर्तन.आणि आम्ही गोष्टी सांगतो स्वातंत्र्याच्या……विकासाच्या गोष्टी करतो.काय आमचे आपसी झगडणे बरोबर आहे!काय एकमेकांच्या कुरघोडी काढणे बरोबर आहे!काय आम्हाला हे समजत नाही!समजते पण आम्ही त्यावर विचार करीत नाही.मग जिथे विचारत नाही तिथे आम्ही झगडणार नाही तर काय?स्वातंत्र मिळुन एवढी वर्ष झाली.पण आम्ही काही शिकलो नाही.फक्त एकच गोष्ट शिकलो.शत्रुला जवळ करायचं. शत्रु कितीही वाईट वागला तरी चालेल.आम्हाला काय त्यात.आम्ही तर सुखी आहोत ना. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एवढे वर्ष लागले.पुन्हा परत जाण्याची देशातील नागरिकांची इच्छा दिसते.आम्ही आमच्या देशभक्तांनी वाहलेले रक्त विसरले आहोत.शत्रुला जवळ करुन आम्ही आमच्या देशाला आजही विकतो की काय असे वाटायला लागले आहे . त्या हुतांम्यांना स्वातंत्र्याच्या ध्येयाने घेरले होते.स्वातंत्र्य मिळविल्यावर आमच्या देशात सुख नांदेल असे वाटले होते.गरीबही सुखी समाधानाने जगतील असे वाटत होते.पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही मात्र त्या गरीबांना विसरुनच गेलो आहोत.आमच्या देशातला शेतकरी आत्महत्या करतो आहे.सुशिक्षित बेरोजगार सुद्धा आत्महत्या करत आहे.एवढेच नाही तर शिक्षक ही आत्महत्या करत आहे.जणु आत्महत्याचे सत्रच सुरु झाले की काय असे वाटत आहे.याला जबाबदार कोण? मुख्य म्हणजे ज्यांच्या हाती देश चालवायला दिला ते की आम्ही सामान्य नागरिक.हेच आज कळेनासे झाले आहे. शाळेचा विचार केला तर प्रत्येक शाळेत शिकणारे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भवितव्य आहे.आज हेही भवितव्य आत्महत्या करत सुटले आहे.कशासाठी?तर त्यांना शाळेत शिकायची इच्छा नाही.शिक्षक मारतात.शिक्षक काही बाही बोलतात.परिक्षेत नापास झालो.मायबाप बोलले.मित्र बोलले.इत्यादी कारणे……सहनशिलता उरलेली नाही.जे चांगले शिक्षक असतात.त्यांना खासगी शाळेत संचालक जगु देत नाही.सरकारी शाळेत सरकार जगु देत नाही.चांगले शिक्षक जरी विद्यार्थ्या वर रागावत जरी असतील तरी विद्यार्थ्यांना ते अापलेसे वाटतात.आत्महत्या मुळीच करणार नाहीत.पण जे मुळीच शिकवीत नाही.त्यांच्यामुळे नापास व्हायची पाळी येते,ते शिक्षक चापलुस असल्याने संचालकाला प्रिय असतात.हे न सांगितलेले बरे. आमचा शेतकरीही तसाच.त्याला या स्वतंत्र देशात न्याय मिळत नसल्यामुळे तोही आत्महत्या करतोय.अलिकडे सैनिकही आत्महत्या करायला लागलाय .का बरं? तर आमच्या देशातील परिस्थिति बदलत नाही म्हणुन. त्यांना कसे वाटत असेल आकाशातुन ते हुतात्म्ये बघत असतील भारतातील ही दयनीय स्थिति.त्यांना वाटत असेल बेकार आम्ही ह्या अशा लोकांसाठी मरण पावलो.आम्ही ही आमचा परिवार पाहिला असता तर झालं असतं असं त्यांना वाटत असेल.कारण देश गुलामीकडे वाटचाल करत असल्याचे जाणवते. भारतात आतंकवाद फोफावत चालला आहे.प्रत्येकजण आतंकवाद्यांचे शिकार बनत चाललेे आहे.अश्रु पुसायला कोणी वाली नाही.देशातील तुरुंगात कैद्यांना कैदेसारखे वाटत नाही.त्यांचे पुनर्वसन जोरात सुरु आहे.कोर्टात न्यायाचा धाक उरला नाही.देशातील नागरीकांना कायद्याचा धाक नाही.ज्यांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे……ते कोर्टातुन मुक्त होत आहे आणि भलत्यांनाच शिक्षा होतांना दिसत आहे.खरंच यामुळे कायद्याला कोण घाबरणार! न्यायदान गरिबांसाठी उरलेले नाही.तिथंही श्रींमतांची मक्तेदारी निर्माण होत आहे.वकीलांची फौज जास्त पैसे घेऊन न्याय हा श्रीमंताच्या बाजुने वळत असतांना न्याय गरीबांना मिळणे मुश्किल झाले आहे.खरं तर गरीबांनी फक्त अत्याचारच सहन करायचे हेच का इथले धोरण.खरंच आम्ही स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत का?पोलिसापासुन तर न्यायाधीश पर्यंत सगळेच घटक गरीबांना न्याय देवु शकत नाहीत.मग गरीबांनी,सामान्यांनी न्याय तरी कुठे कोणाकडे मागायचा?शिवाय न्यायालयात न्यायनिवाड्याचे धोरण वेळखाऊ तर आहेच आहे पण खर्चिकही.म्हणुन आम्ही आजही मागे आहोत.मागे राहात चालले आहोत. आमच्या सरकारने अच्छे दिन चे आश्वासन दिले.ते करत आहेत.त्याची अंमलबजावणी.पण आधीच धुळ खात असलेली आम्ही माणसे…..आम्हाला धुळीत राहायची सवय.मग आम्हाला होणारा बदल पचनी पडत नाही.आम्हीही आमची विचारशक्ती बदलायला हवी.जेणेकरुन आम्हाला आमचा भारत देश बदलवता येईल.निव्वळ एकमेकांचे दोष काढुन आम्ही आमच्या देशाचा विकास करु शकत नाही.त्यासाठी आम्हालाही बदलण्याची गरज आहे.रस्त्याने जाणा-या आमच्या महिला भगिनींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. ही हिंमत आम्ही जोपर्यंत आम्ही आमच्यात निर्माण करणार नाही.तोपर्यंत आमचै देश बदलणार नाही. आमचा देश बदलायला हवा.आमच्या देशात स्वातंत्र्य नांदायला हवं.सर्वांना न्याय मिळायला हवं.सर्वांना मोफत उच्च शिक्षणाच्या कक्षा असायला हव्या.सर्वांना पोटभर जेवण मिळायला हवं.आमच्या महिलांनाही बिनधास्त रात्री अपरात्रीही फिरता यायला हवं.तेव्हाच ख-या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालं हे म्हणता येईल.नाहीतर हे स्वातंत्र्य न्याय बंधुता जर श्रीमंतांसाठीच असेल तर आम्हाला स्वातंत्र्याचा उपयोग नाही.आम्ही त्यापेक्षा गुलामच असलेले बरे!
अंकुश शिंगाडे लेखक नागपुर१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड ४४००३५ मो नं ९३७३३५९४५०,९९२३७४७४९२
स्वातंत्र्यदिन विशेष
पुन्हा एकदा देश स्वतंत्र्य करावा लागणार नाही
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०(संस्कार) शिक्षक शिस्त लावतात की मानसिक त्रास देतात ते आता कळेनासे झालेय.विद्यार्थी शिकला पाहिजे.त्याने ज्ञानाचे बाळकडु प्याले पाहिजे असे आपण म्हणतो.त्याला शिस्तही लागली पाहिजे असेही आपण म्हणतो.पण शिस्त काही दोन मिनिटात लागणारी गोष्ट नाही.शिस्त लावतांना कोणताही त्रास देवु नये. एका शाळेची गोष्ट सांगतो.पंधरा आँगष्टचा कार्यक्रम अगदी आठ दिवसावर येवुन ठेपला होता.मुलांजवळ शालेय गणवेश होता.पण जोडे मोजे नव्हते.तसेच काही मुलींनी रिबीनही बांधलेल्या नव्हत्या.कपाळावर काही मुलींनी टिकल्या लावलेल्या नव्हत्या.तर काही मुलींच्या हातात बांगड्याही नव्हत्या.काहींच्या पायात तर साधी चप्पलही नव्हती.बहुतेक त्यांच्या घरची परिस्थिती बरोबर नसेल कदाचित.त्यामुळे त्यांच्या पायात चप्पल नसेल असेही वाटत होते. भारत १९४७ ला स्वातंत्र्य झाला खरा…..आज एवढी वर्ष झाली खरी……पण आजही भारताची परिस्थिती फारशी सुधारलेली नाही.आजही मायबाप काबाडकष्ट करतात.यात कधी त्यांच्या हाताला काम असतं तर कधी काम नसतं.पावसाळ्याचे तर चार महिने उपासतापास भोगतच काढावे लागतात.त्यातच आपली मुले शाळेत गेली पाहिजे.त्यांना कोणी काहीही म्हणु नये.म्हणुन पालकवर्ग आपल्या पाल्यावर अतोनात पैसा खर्च करीत असतात.पण पैसा आहे तोपर्यंत ठीक आहे.पण जिथे साधी वितभर असलेली पोटाची खळगी भरता येत नाही.तिथे शालेय गणवेश,गंध टिकल्या,बांगड्या,रिबीना ह्या गोष्टी पालक कुठून पुर्ण करणार? शहरातील मुलांचं ठीक आहे.पण जिथे अति दुर्गम भाग आहे.त्या भागात मात्र हीच परिस्थिती अनुभावयास मिळते.आम्ही शिकलो.मोठे झालो.योगायोगानं नोक-या लागल्या.कोणी डाँक्टर इंजिनियर बनला तर कोणी शिक्षक.कोणी उद्योजक……आम्ही आमची परिस्थिती सुधरवली.पण जे डाँक्टर इंजिनियर शिक्षक बनले खाजगी आस्थापनेत.मला नाही वाटत त्यांनी गरीबी अनुभवली असेल.आजही डाँक्टर इंजिनियर बनतांना लाखो रुपये खर्च करावा लागतो.तो पैसा श्रीमंत पालकच लावु शकतो.खाजगी शाळेतही नोकरी मिळवितांना लाखो रुपये डोनेशन म्हणुन द्यावा लागतो.हाही पैसा श्रीमंत पालकांनीच आपल्या पाल्यांना नोकरीला लावतांना खर्च केलेला असतो.अशावेळी ही शाळेत शिक्षक म्हणुन शिकविणारी मंडळी त्यांनी गरीबी न भोगलेली असल्याने त्यांना गरीबीची जाणीवच नसते.त्यांना मायबापाच्या घरीही गरीबी भोगावी लागली नाही तसेच आता नोकरी लागल्यावरही गरीबी भोगावी लागत नसल्याने गरीबी कशी असते याचा साधा विचारही ते शिक्षक करीत नाही.म्हणुनच ते शिस्त लावतांना रिबीनी,कुंकू बांगड्या जोडे मोजे.पांढरे प्रेस केलेले कपडे याचा अट्टाहास करीत असतात.त्यातच काही मुलांनी पैशाअभावी ह्यापैकी एखादी वस्तु वापरली नसेल तर त्या मुलांना शाळेत मानसिक व शारीरिक त्रास दिला जातो.त्यांना छडीचा वापर बंद केलेला असुनही हातावर छड्या मारल्या जातात.ती निरागस मुले हे शिक्षकांचे मारणे बोलणे आपल्या आईवडीलांना सांगतात,पण ते हतबल असतात.त्यातच घरी विश्वकोटीचं दारिद्य असल्याने व मायबाप घेवुन देवु शकत नसल्याने व शिक्षकांचे सतत त्रास देणे सुरु असल्याने मुले हतबल होवुन आत्महत्या करतात.पण आधीच गरीब असलेली ही पालकमंडळी त्या मृत्युवर न्याय मागु शकत नाही.साधी पेपरला अशी घटना छापुन येत नाही वा पोलिस स्टेशनलाही त्या घटना जात नाहीत आणि एखादी घटना गेलीच पोलिस स्टेशनला तर शालेय प्रशासनातील सर्व घटक हे पुढे होवुन अशा घटना दाबुन टाकतात.ही वास्तविकता आहे. सर्व विद्यार्थी शिकले पाहिजे.ते पुढे गेले पाहिजे म्हणुन सरकारने अलिकडे शिक्षण निःशुल्क केलं.वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसारख्या योजनाही आणल्या.पण तरीही समाजातुन आजही सर्व विद्यार्थ्यांना शिकता येत नाही.त्याचं कारण एक हेही आहे. जो देश स्वातंत्र्य होवुनही आत्मनिर्भर झाला नाही,त्या देशात सर्व विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे हे ठीक आहे.पण शिस्तीच्या नावावर व शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांची आर्थीक पिळवणुक करणे,त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे.आजही छडीचा वापर करणे.कितपत बरोबर आहे. विद्यार्थी शिकतात.त्यांचीही शिकण्याची इच्छा असते.पण त्यांच्या शिक्षणावर मद्याचाही असर होतो.देशात आजही दारुबंदी नाही.घरी त्यांचा बाप मायचे दागीणे चोरुन वा घरचे सामान विकुन कामाला न जाता दारु पितो.आई हतबल.नशिबाला दोष देत देत त्याच्याजवळ दिवस काढीत असते.ती कामाला तर जाते.पण तिच्याजवळ पैसे नसल्याने ती देखील मुलांना चपला कुठून घेवुन देईल?त्यातच जोड्यामोज्याचे दर फार जास्त असतात. शिक्षकांना शिस्तच लावायची असेल तर खिचडीसोबत शासनाने रिबीनी,जोडे,मोजे,टिकली वा गंध,तसेच गणवेशही देण्याची गरज आहे.मुलांना आपोआपच शिस्त लावता येईल.पण आजचा आमचा शिक्षक एवढा मतलबी झालाय की तो मिळालेल्या पैशातुन यात्रा करेल.संचालकांना त्याचं घर भरण्यासाठी पैसा देईल.नव्हे तर आपले शौकं पुर्ण करतील.पण ज्या विद्यार्थ्यांवर त्यांचं भविष्य चालतं.ते पगार कमवतात.त्या विद्यार्थ्यांना वरील वस्तुसाठी त्रास देतील.पण त्या वस्तु पुरवणार नाहीत. मुले जेव्हा वयात येतात.तेव्हा त्यांच्यात आपोआपच शिस्त लागते.ती शिस्त कोणी लावावी लागत नाही.बाजुची मुले परिसरातील मुले,महाविद्यालयातील मुले ह्या घटकांना जेव्हा ही मोठी झालेली मुले जेव्हा पाहतात.तेव्हा मात्र त्यांच्या स्वतःच्या राहणीमानाबद्दल वैषम्य वाटतं.ती आपोआपच स्वतःला सुधारणेच्या कक्षेत आणतात. शिक्षकांनी शिस्त लावावी.ते त्यांचं कामच आहे.पण त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना अट्टाहास करायला नको.त्यांनी गंध बांगड्या,जोडे मोजे ही काहीही करुन वापरलीच पाहिजे यासाठी बंधन करु नये.त्यासाठी छडीचा वापरही करु नये वा धाक देवु नये.तर या विद्यार्थ्यांना हळुवार प्रेमाने समजुन सांगावे.प्रेमानं तर जग जिंकता येतं.ही मुले का बरं नाही सुधारणार!पण त्यासाठी वेळ द्यायला हवा ना.ती परिस्थीतीही पाहायला हवी की नाही. परिवर्तन काही एका दिवसात होणार नाही.होत नाही.अन् परिवर्तनच एका क्षणात हवं तर त्याप्रकारची शासनानं सोय करावी वा साधनं उपलब्ध करुन द्यावीत.रोज रोज शाळेत उशिरा येणारा मुलगा त्याला दररोज उशिर होतो हे आपल्याला दिसते.पण बाप मरुन गेल्यानंतर आई अंथरुणाशी खिळलेली असतांना घरातील सारी कामं करुन,आईला घास भरपुर तो शाळेत येतो.त्यामुळं त्याला उशिर होतो.या गोष्टी आम्ही समजुनच घेत नाही.खरं तर या गोष्टी समजण्यासाठी शिक्षकांनाच समुपदेशनाची गरज आहे.त्याशिवाय खरे विद्यार्थी घडणार नाही.घडविता येणार नाही.भारत स्वातंत्र्य झाला तरीही…….. प्रत्येक देशाचं भवितव्य या वर्गखोल्यातुन घडते.सर्वच श्रीमंताची मुलं ही डाँक्टर इंजिनियर बनतीलच असे नाही.एखाद्या शाळेत न जाणा-या गरीबांचीही मुले काहीतरी विलक्षण करुन जातात.मायकेल फँरेडे,लुई पाश्चर,थाँमस अल्वा एडीशन हे त्यापैकीच.ते कोणत्या शाळेत गेले शेवटपर्यंत.पण अनुभवाच्या जोरावर त्यांनी असं संशोधन केलं की ते आजही आठवतात.त्यांना काय शिस्तीची गरज होती!त्यांच्या आईवडीलांनी त्यांना शिस्त लावली होती!नाही.असे जर असते तर स्वतःचं नुकसान करु नये हे सर्वांना समजते.पण तरीही दिव्याचा शोध लावण्यासाठी एडीशनने आपल्या घरच्या उभ्या धानाच्या गंजीलाच आग लावली होती.बापाने त्यावर घरातुन हाकलुन दिल्यावरही एडीशनने आपला छंद बंद केला नाही उलट रेल्वे डब्यात वास्तव्य करीत असतांना वर्तमानपत्र विकुन पोट भरीत असतांना विजेच्या दिव्याच्या अट्टाहासाने पिवळा फाँस्फरस डब्यात सांडुन रेल्वेला आग लागली होती. रेल्वे आपली असुन ज्वालाग्राही पदार्थ नेवु नये.गुटखा खावु नये,दारु पिवु नये.ह्या वाईट सवयी.चांगल्या सवयी नाहीत.ह्या गोष्टी मुलांमध्ये बालपणापासुन मायबाप, परिसर,तसेच शिक्षकही बिंबवीत असतात.पण मोठे झाल्यावर त्या पुड्यांवर कँन्सर होतो हे लिहिलेले असतांनाही मुले गुटखा खातातच. खरं तर मुलांना शिस्तीची पाहिजे तेवढी गरज नाही.धर्माच्या चालीरितीत त्यांना लहाणपणापासुनच कोंडुन ठेवु नये.त्यांनाही परिवर्तनाच्या कक्षेत येवु द्यावे.टिकल्या लावणे,रिबीन बांधणे ह्या परिवर्तन तोडणा-या गोष्टी.तर केसांना वलय देणे,टिकल्या न लावणे ह्या परिवर्तन वादी गोष्टी.आज जमाना बदललाय.पाश्चात्यांचं अनुकरण करण्याचा काळ.चांगलं दिसलं पाहिजे म्हणुन ह्या गोष्टीचा अट्टाहास.पण ज्यांच्याजवळ जवळ म्हणुन पैसा काहीच नाही त्यांचं काय?म्हणुन काय त्या मुलांना चोप द्यावा?ह्या गोष्टी कोणालाच पटत नाही.हवं तर मुलांना शिरवितांना त्यांच्या छंदाची प्रशंसा करा.मग पाहा त्या अळीचं किती सुंदर फुलपाखरु कसे बनतेय ते……. आम्ही जिथे दप्तराचं ओझं कमी करु शकत माही तिथे काय त्यांना शिस्त लावणार!खरं तर आम्हाला शिकवायला त्रास वाटतो.म्हणुन आम्ही घरचा अभ्यास देवुन त्या विद्यार्थ्यात गोंधळ निर्माण करतो.त्याला बळीचा बकरा बनवतो.हे बरोबर नाही.विद्यार्थी हाही एक दीवच आहे.कोणाच्या पोटचा गोळा…….त्याचा प्राणच.पण काय करता..त्या बाळाचं कधीकधी नशिबच फुटकं असतं.कधीकधी हाच बाप दारुसाठी सख्ख्या मुलीलाही विकुन टाकतो.असा आमचा समाज.याचा शिक्षकांनी तरी विचार करावा.विद्यार्थ्यांना शिस्त लावतांना त्रास देण्याची गरज नाही.हळुवार फुंकर मारायची गरज आहे.जेणेकरुन त्याची तर प्रगती होईल.देशाचाही विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि पुन्हा एकदा देश स्वतंत्र्य करावा लागणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
झेंडा ऊँचा रहे हमारा
आम्ही आमच्या झेंड्याची शान राखतो.त्यासाठी झटतो.त्याची आठवण राहावी म्हणुन पंधरा आँगष्ट,सव्वीस जानेवारी साजरा करतो.नव्हे तर या दिवशी देशात देशभक्तीचं वातावरण तयार करतो. ‘भारत माता की जय’ ‘तिरंगी झेंडे की जय’अशा जयघोषात आमचे राष्ट्रभक्तीचे वारे तयार होतात.प्रत्येक शाळेशाळेतुन मग मिरवणुक काढली जाते.मग ती मिरवणुक एका ठिकाणी थांबवली जाते.तिथे वक्त्यांची भाषणे होतात.ते वक्ते मुलासमोर भाषणे देतात.यात काही बडेजाव शब्दही बोलतात. वक्ते पाहता ते इमानदार असतातच असे नाही.काही बेईमानही असतात.पण तरीही आपले हेवेदावे सोडून ही मंडळी देशासाठी स्वातंत्र्याचं वातावरण विद्यार्थ्यात निर्माण करुन एकप्रकारे देशाला आदर्श नागरिक देण्याचे काम करतात.स्वतः कसेही वागो,तेवढं चांगलं भाषण देण्याचं काम करतात.मग विद्यार्थ्यांना खावू वाटप होतो. ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा.झंडा ऊँचा रहे हमारा’खरंच आम्हाला जसा आमचा देश प्यारा आहे.तसा आम्हाला आमचा राष्ट्रध्वज तिरंगाही आणि जसा आम्हाला तिरंगा प्यारा आहे.तसा आम्हाला आमचे संविधान ही प्यारे असू द्या. राष्ट्रभक्ती ही केवळ स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन यापुरती मर्यादीत ठेवु नका.तर ती राष्ट्र भक्ती तुमच्या नसानसात कुटकुट भरली असली पाहिजे.ती सदोदीत तुमच्या सोबत असली पाहिजे.केवळ ‘झेंडा उँचा रहे हमारा’ म्हणण्याला अर्थ नाही.केवळ भारत माता की जय म्हणण्याला अर्थ नाही.आम्ही भारतीय असल्याने भारत माता की जय म्हणणारच.म्हणायलाच हवे. तरीही आम्ही फितुरीसारखे वागतो याच देशात.रोज बनवलेले कायदे तोडून आम्ही आमच्या संविधानाचा रोजच अपमान करतो.रोजच वर्तमानपत्रावरुन लक्षात येतं की काय घडलं देशात आणि काय घडत आहे देशात?इथे तर रोजच शेतकरी आत्महत्या पाहायला मिळतात.अगदी कळस चढला आहे या आत्महत्यांनी.रोजच बलत्कार घडतात देशात कुठे ना कुठे?अन् रोजच मारल्या जातात येथील देशवासीयांच्या भावना.आमचेच भाऊबहिण रोजच फितुरीसारखे वागतात या देशात.रोजच फितुरीने आमच्या देशातील संभाजी मारले जातात.रोजच अफजलखानासारखा पाकिस्तान डाव रचतो.रोजच कित्येक आमच्या सैनिकांना मराठ्यांसारखे देशाच्या सीमेवर मरावे लागते.अन् रोजच आमच्याच नकाशातील भाग दुस-या देशाच्या नकाशात जोडले जातात.तरीही आमचे नेते मौन बाळगतात.त्यांच्यासमोर शरणागती पत्करतात.चर्चा करु म्हणतात.ते चर्चेला ऐकत नाही.अंतरराष्ट्रीय कायद्याला मानत नाहीत. भारतीय नेते भाषणापुरते ठीक आहेत.पण प्रत्यक्षात वागतांना त्यांना देशाचं काही घेणं देणं नाही असं जाणवतं.केवळ चर्चा करुन,अहिंसा अहिंसा करुन देशाला न्याय मिळणार नाही.तर देशाला न्याय मिळवून द्यायचे झाल्यास युद्ध स्तरावर लढायला हवं.काश्मीरचे रोजचे होणारे हत्यासत्र रोखले पाहिजेत.अरुणाचल चा जो भाग चीनच्या नकाशात दिसतो.तो भाग आपण अंतरराष्ट्रीय न्यायालयात सनदशिर मार्गाने लढून मिळवला पाहिजे.आम्ही फक्त लढणे विसरलो.शत्रुला मित्र समजायला लागलो.पण शत्रु आपल्याला मित्र समजत नाही.ते हिन्दी चीनी भाई भाई म्हणत ते कुरघोडी करतात.बाबरासारखे व इंग्रजासारखे या देशात शिरकाव करतात आणि अख्खा देश पोखरुन टाकतात.आम्हालाच गुलाम बनवू पाहतात आणि मग अत्याचार. मित्रांनो आज चीनचा माल देशात येत आहे.सरेआम विकला जात आहे.आम्हीही स्वखुशीनं तो माल विकत घेतो.तसेच देशात वागतांना आम्ही आमच्याच आईबहिणीची इज्जत लुटतो.न्यायपालिकेतून आरोपींना बा इज्जत मोकळं केलं जातं.कधी वय लहान असल्याचा हवाला देत.तर कधी बलत्कार पिडीता तिथे गेलीच कशी याचा हवाला देत.कधी खुन होतो.लहान लहान गोष्टीसाठी.पण तेही न्यायालयातुन मोकळे होतात.कधी नापीकी म्हणून तर कधी सरकारी रसद मिळते म्हणून या देशात आत्महत्या…….या देशातील तमाम झेंडा ऊँचा म्हणणा-यावर कलंक आहे.आमचे आमच्या देशात स्वार्थासाठी भांडणे आमच्याच देशाला गुलाम करणारे तत्व आहे.त्या तत्वाचा त्याग केल्याशिवाय आम्हाला आमचा देश सुधारता येणार नाही.आमचा देश महान आहे.असे आम्ही रोजच म्हणतो.पण त्या देशाला महान बनविण्यासाठी आमचे आपापसातील भांडणे योग्य नाही.आमच्या देशातील नागरीकांनी परकियांचा माल घेणे योग्य नाही.आमच्या देशातील कोणत्याही महिलेवर बलत्कार करणे योग्य नाही.तसेच आदर्श नागरिकत्वाचे पैलू न वापरता झेंडा उँचा म्हणण्याचा जयघोषही करणे योग्य नाही.त्याने देश महान बनणार नाही.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण
डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश-राजा माने